Thursday 31 December 2015

सरलेलं वर्ष... अनुभवांचं

     अजुन एक नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतंय.  सगळ्यांना नव्या वर्षाची उत्सुकता लागलीये.  सगळेच नवीन वर्षाचं स्वागत गेल्या १५  दिवसांपासूनच करू लागलेत.  पण खरं सांगू का.. हे वर्ष ना मला सोडवतच नाहीये.  वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून वेगवेगळे अनुभव आलेत.  इतके की कदाचित पूर्ण आयुष्यभरही एवढे विचित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव एकाच वर्षात येणार नाहीत.
     घरगुती भांडणांपासून ब्रेक-अप पर्यंत आणि नव्या नात्याच्या सुरुवातीपासून ते घर संभाळण्यापर्यंत , mix झालेल्या emotions पासून अगदी depression पर्यंत २०१५ माझ्यासाठी पूर्णपणे emotions, feelings ( स्वत:च्या आणि दुसर्यांच्याही ) समजण्या आणि समजवण्यात गेला.  आणि खर तर तेच आपल जग असत.  सगळ्या भावभावनांची मिळुनच दुनिया होते आणि त्यांचीच दुनियादारी . अशाच सगळ्या  emotions मुळे वर्षातल्या अगदी पहिल्या महिन्यापासून माझ्या स्वभावात वेगवेगळे बदल होत होते.
    आधीच वर्षीच्या emotions आणि confusion चा पूर्ण भार मनावर घेऊनच जानेवारी उजाडला होता. कॉलेज फेस्टिवल असूनही कॉलेज ला न जाणं, एकटच राहणं, चिडचिड-वैताग स्वत:वर काढणं, असा एकूणच depression मुळे अजुनच confusion वाढत गेलं.  confusion of emotion असं म्हणेन मी त्या वेळेला.  म्हणजे सत्य आपल्या समोर आहे, ते कळतंय पण मानता येत नाहीये, का? तर ते सत्य आपल्याला खोटं व्हावं, ती आधीची वेळ पुन्हा यावी आणि आपण ती परिस्थिती पुन्हा दुरुस्त करावी अशी इच्छा असते जी कधीच पूर्ण होणार नसते. आणि हीच गोष्ट जास्त बोचते.  त्यावेळी माझं एकच काम असायचं.  झोपायचं, झोपून उठलं की बेडरुम लॉक करून एकट्यात बसून राहायचं.  आणि असं बसून राहीलं की विचार आपोआपच येतात आणि ते चांगले असणं नक्कीच शक्य नाही.
     आज मागे वळून पाहीलं तर कळतं, पहिल्या 3-4 महिन्यांत या depression मुळेच माझी social life सुद्धा बिघडू लागली होती.  समाजात वाया जाणं जे म्हणतात तेच झाले.  पण हे सलग 3-4 महिने चाललं असं नाही.  माणूस वाईट होतो ते वाईट परिस्थितीमुळे.  आधीची चांगली स्थिती तो पूर्णपणे विसरतोच असं नाही.  मध्ये मध्ये मी भानावर यायचे.  एकदा तर एवठी भानावर आले की समजवणार्याच्या प्रेमातच पडले की काय असं वाटू लागलं.  Crush की काय असतं तसं काहीतरी वाटू लागलं मलाही, पण ये सब झूट मूट का scene समजून सोडूनही दिलं आणि ये रे माझ्या मागल्या करत लागले परत त्याच वाटेला.
     पण ह्या वर्षानेच कदाचित ठरवलं असावं, 'हिला धक्के देतच राहूया'.  म्हणूनच की काय, अचानक कोणाचातरी फोन येतो, चार महिने गप्प असलेलं तोंड आणि मन बोलतं करतं.  मग मीच माझ्याभोवती बांधलेली बंधनं सूटतात.  मला खरी मी सापडते.  आधीची.  मग भविष्याचा विचार होतो, अन् तिथेच घोडा अडतो.  कारण जिथे भविष्याचा विचार होतो तिथे मनाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्यात भूतकाळ पून्हा आठवतो.  पण तो आता आठवूच शकतो, बाकी काहीच नाही ही जाणीव पुरेशी होती.  जग असंच असतं - जगणारं, टिकणारं.  आयुष्यभर.  आणि ज्यामध्ये कळी फूलूच शकणार नाही असं रोपटं तरी कोण लावतं ना आजकाल.मी लावलेल्या रोपट्यामध्ये कळी फुललीही आणि त्याच फुलाच्या सुगंधाने आधारही दिला.  रोपटं जसजसं मोठं होऊ लागतं तशी त्यालाही आधाराला काठी लावावी लागते.  ती विश्वासाची काठी आता मी द्यायची होती.  माझा तापट स्वभाव आता कमी करायचा होता आणि कोणत्याही आपुलकीच्या नात्यासाठी, नातं टिकवण्यासाठी स्वत:त बदल करावाच लागतो, तो करायचाही असतो.  कारण त्यात नातं टिकवण्याचं सुख असतं.  So मी आता हळूहळू पुन्हा शांत, समंजस मुलगी झाले.
     सगळ्यांना असं कोणी ना कोणी हवं असतं आधारासाठी.  मला कोणीतरी बोलायला लागतं, मनातलं कोणा एकाला सांगायला लागतं.  मी एरवी गप्प असले तरी माझ्या त्या रोपट्याला मी सगळं सांगते.  अशावेळी तोच उपयोगी येतो.  म्हणजे एकीकडे झालेला अपमान, पूर्वीपासूनचे न्यूनगंड, लिखाण चांगलं झालय की नाही याचं nervousness, असं सगळंच त्याला सांगत गेले अन् मन मोकळं होत गेलं.  याचा परिणाम म्हणजे confidence वाढत गेला, न्यूनगंड कमी झाला.  याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मी 'बारीक म्हणजे मुर्ख' असं समजणार्यांना माझा 'मुर्खपणा' बिनधास्त दाखवू शकते.
     बरं ह्या सगळ्या वर्षात अगदी शेवटच्याच महिन्यात मोठी जबाबदारी अंगाशी येऊन आदळली.  म्हणजे घरच येऊन आदळलंय, तेही जबाबदारीच्या स्वरूपात.  पण जबाबदारी अंगावर पडली की माझ्यासारख्या आळशी मुलीला सुद्धा झोपेतून खाडकन उठवते.  आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात का होईना, मी उठलेय या गोष्टीचं आईलाही कौतूक वाटतंय.