Tuesday 6 September 2016

किनारा

     एकदा समुद्रात गेलं की एकतर वार्याच्या वेगाने पुढे सरकत राहावं, नाहीतर वार्याला आपल्या दिशेने न्यावं. संघर्ष करतच राहावा. जगण्यासाठी... टिकण्यासाठी... किनार्यावर यावं ते फक्त मोती होऊन... माणसाच्या हातात.. जो आपल्याला सांभाळून नेईल. नाहीतर तुटलेले शिंपले तर कित्येक असतात किनार्यावर, वाट चुकलेले, फक्त तरंगत राहिलेले किंवा आपल्या आत मोती असल्याचा गर्व घेऊन आलेले... ज्यांना खेळण्यासाठी लहान मुलंही हातात घेत नाहीत.


No comments:

Post a Comment